तुझ्या आठवणींना भेटून,
बसतो जेव्हा डोळे मिटून,
नकळत ओले होतात नयन,
जेव्हा येते मज तुझी आठवण.
तुझ्या आठवणींत जातो रमून,
मीच माझे भान हरपून.
अश्रू नकळत वाहत असतात,
जणू किती लोक पाहत असतात.
डोळ्यांसमोर येतो, तुझ्या आठवणींतील प्रत्येक क्षण,
जेव्हा येते मज तुझी आठवण.
तो हळवा शीतल वारा होता,
की तूच मला स्पर्शून गेलीस?
अश्रू आपोआपच सुकले,
की तूच त्यांना पुसून गेलीस?
निराश होऊन राहतं हे मन,
जेव्हा येते मज तुझी आठवण.
तुझ्या आठवणींत इतका रमतो,
की तुझ्या असण्याचा भास होतो.
पण डोळे उघडून जेव्हा पाहतो,
तो सूर्य मावळताना दिसतो.
कोणासोबत वाटावे मी माझे एकटेपण,
जेव्हा येते मज तुझी आठवण?